द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले
द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध गुप्तहेरांच्या महान कारवायांची आणि मराठा साम्राज्याच्या उदयाची कहाणी सन १६६३. शिवाजी राजांच्या चिमुकल्या स्वतंत्र स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी उत्तर दक्षिणेकडे शत्रू सरसावून बसले आहेत. नुकताच मुघल सुभेदार शाहिस्तेखान पुण्यात त्याच्या सर्व सैन्यानिशी तळ ठोकून बसला आहे. स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करायला सज्ज मावळ्यांच्या नशिबी ‘ रात्रंदिन युद्धाचा प्रसंग’ आहे. यांना ही लढाई किती वेळ चालणार ठाऊक नाही. पण आहे तो शिवाजीराजेंवर असणारा ठाम विश्वास. राजे आपण उभं केलेल्या स्वराज्याची वाताहात होत असताना पाहत आहेत. ते दुःख आणि जोडीला मात्र वेगळ्याच विवंचना आहेत. सततच्या लढायांनी त्रस्त सरदार आता मुघलांशी तह करायचा सल्ला देत आहेत. तर स्वराज्याची आर्थिक स्थिती इतकी ढासळली आहे, की सैन्याला वेतन देण्याइतकेही पैसै शिल्लक राहिलेले नाहीत. अशा डळमळीत परिस्थितीत राजांनी जातीने छापा घालून शाहिस्तेखानाला शास्त केली. पण अजूनही समस्या संपल्या नव्हत्या. स्वराज्य पुन्हा उभं करायचं होतं, त्यासाठी लागणारं प्रचंड आर्थ...