आजवर वाचलेल्या आत्मचरित्रांचा विचार केला तर ते कुणी लिहिलं आहे, यावरुन त्यात कोणता मजकूर जास्त वा कमी असेल याचा आधीच अंदाज बांधता येतो. लिहिणारी “ती” असेल तर तिचं बालपण, पालक, भावंडं, त्यापुढे लग्न, नवऱ्याचं कुटूंब, तिथले हरतऱ्हेचे नातेसंबंध, संसारातील सुखाचे क्षण आणि वादळे हा भाग तर हटकून असतोच आणि जास्त प्रमाणात असतो. आत्ता वाचलेलं पुस्तक माझं हे निरीक्षण खरं ठरवतं. पण यात वर नमूद केल्यापेक्षाही दोन अधिकच्या आणि विशेष गोष्टी आहेत. एक म्हणजे लेखिका मूळची born and brought up in कोकण म्हणजे रत्नागिरीतील फणसवळे आणि सासरकडून सिंधुदुर्गातील भिरंवडेकडची असल्यामुळे सुरुवातीच्या भागात अस्सल कोकणी लाल मातीचा गंध जाणवतो. आणि हे एका विचारी दलित स्त्रीनं लिहिलेलं आत्मचरित्र असल्यामुळे बालपणापासून ते अगदी वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळ्या तऱ्हेने आणि वेगवेगळ्या वाटेने जातीभेद तिच्या आयुष्यात कसा झिरपत गेला, ते दाखवून देण्यात लेखिका यशस्वी ठरली आहे. हे पुस्तक आहे उर्मिला पवार यांनी लिहीलेलं आयदान. आयदान म्हणजे आपल्या संसारात बांबूपासून तयार केलेली सूपं, रोवळ्या, परद्या, हारे, क...
Comments
Post a Comment