गीतरामायण
#पुस्तकांच्या_पानांवरुन २०२१: पर्ण पाचवे अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली... गीतरामायणाचे सूर घुमले नाहीत, असं एकही मराठी घर नसेल. गीतरामायण म्हणजे शुभंकर संस्कारांचं पाथेय ! महासागरासारखी व्याप्ती असणारी रामकथा केवळ ५६ गीतांच्या माध्यमातून शब्दबद्ध करणाऱ्या गदिमा तथा गजानन दिगंबर माडगूळकर आणि त्या गीतांना आपल्या श्रवणीय सुरांचे अलंकार चढवणाऱ्या बाबूजी तथा सुधीर फडके यांचे मराठी रसिकांवर अनंत उपकार आहेत. १९५५ साली पुणे आकाशवाणीचे सीताकांत लाड यांना धार्मिक किंवा नैतिक थीमवर आधारित लोकांना आवडेल, असा एखादा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी त्यांनी गदिमांना विचारणा केली. (म्हणजे तसं बघायला गेलं तर खरंच गदिमांनी गीत रामायण लिहावं ही रामाचीच इच्छा होती म्हणायची!) दोघांनी मिळून रामायणावर आधारित कार्यक्रम करायचा असं ठरवलं. गदिमा गीतं लिहितील, आणि बाबूजी संगीत दिग्दर्शन करतील आणि दर शुक्रवारी एक एक गाणं आकाशवाणीवर प्रसारित केलं जाईल हे ठरलं. आणि १ एप्रिल १९५५ साली 'स्वय...